Wednesday, November 29, 2006

पल्प फिक्शन

उपवर मुलीला पाह्यला यावेत पाहुणे अचानक....

९४ चा शेवटचा सूर्यास्त आम्ही हट्टाने एकत्र पाह्यला.
तो मीरा नायरच्या '१९४७' च्या प्रत्येक सूर्यास्ताएवढाच प्रकर्षाने आठवतोय.

इतिहास किसी भाषाका नाम नहीं.
और न ही किसी उदात्त मानवी संबंध का नाम.
वो तो शक्तिके लिए किया गया एक नितांत अमानुष रक्तस्नान है....

उपवर मुलीला पाह्यला यावेत पाहुणे अचानक
आणि सुरु व्हावी साऱ्या घरादाराची धावपळ
तशी - तुझी स्थिती होते,
जेव्हा जेव्हा मी तुझ्या घरी येतो.....

मी कथा लिहीत नाही.
काल्पनिक गोष्टी सांगायचा मी प्रयत्नही केलेला नाही.
काल्पनिक गोष्टी सांगायचा आणि घडलेल्या गोष्टी लिहायचा.
पण 'यात्रा' घडली हे मात्र नक्की.

पर्वत जब यात्रा के लिए आतुर होता है,
तब प्रतियात्रा नही - नदी बनना होता है....

पलंगावरची चादर सरळ करण्याच्या निमित्ताने
उचलुन नेतेस तू - मुलाचे अस्ताव्यस्त पसरलेले कपडे, त्याचे दप्तर,
किंवा - नवऱ्याने तशीच फेकलेली लुंगी.....

आठवणींचं एक भारी असतं - त्या कालच्यासारख्या आठवतात.
धुरकट होतात, पण जुन्या होत नाहीत.
एखाद्या पिक्चरसारख्या त्या मनात रहातात.
सीन्स पुढेमागे होतात.
कथा तीच रहाते.
कथा तीच - आणि तीच पात्रं.
कथा तीच?
आणि पात्रं?
राहुल म्हणतो तशी कदाचित हा ब्लॉग म्हणजे - माझ्या अनुभवांना मी दिलेली रिऍक्शन असू शकेल.
पण आठवणींना रिऍक्शन कशी देणार?

समर्पण का ऐसा एक विचार
फूल वनस्पतीकी स्वाहा वाणी है.
प्रार्थना मनुष्यकी - इसलिए इतिहास हो जानेका नाम नही.
बल्की इतिहाससे सर्वथा उदासीन होकर वनस्पती हो जानेका नाम प्रार्थना है.....

मला पाणी आणण्याच्या बहाण्याने आत जाताना
केसांवरुन फिरवतेस फणी न विसरता
आणि - चेहऱ्यावरून पावडरचा हलकासा हात....

सामंतांसारखं लिहायचं झालं तर 'यात्रा'चं 'कथानक' पुण्यात सुरू होतं.
सोलापुरात वेग घेतं.
दक्षिण-मध्य रेल्वेच्या डब्यासारखं - भरधाव धावत - गुलबर्गा, रायचुर करत गुन्टकलला पोचतं.
अडखळतं.
अनन्तपूर, धर्मवरम शोधत तिरुपतीत भटकतं.
आणि जीव मुठीत धरुन पुण्यात परततं.
पण संपत नाही.
कदाचित 'नॉन-फिक्शन' मधलं कुठलंच कथानक कधीच संपत नाही.
आपण आपले त्याचे अर्थ लावायचे.
अर्थ तरी काय लावणार म्हणा.....
हे हे असं असं झालं.

समुद्र जब आकाशके प्रती व्याकुल होता है
तब प्रतिआकाश नही मेघ बनना होता है....

माझं आवडतं गाणं लावण्याच्या निमित्ताने शोकेसकडे जाताना
बेमालूमपणे बदलतेस गेल्या कित्येक दिवसांत न बदलेली कॅलेंडरवरची तारीख
आणि स्वत:लाही.....

आम्ही पहिल्यांदा एकमेकांशी बोललो ती दुपार आयदर मला लख्ख आठवतिए, किंवा त्याबद्दल आम्ही इतक्यांदा बोललोय कि ती आम्ही आमच्या मनात 'रीकन्स्ट्रक्ट' केलिए....आठवत नाही.

सूर्य जब पृथ्वीके लिए आकर्षित होता है
तब प्रतिपृथ्वी नही धूप बनना होता है....

पण गायत्री म्हणते तसं माझ्या शाळेतल्या लोकांकडे इतरांकडे नसतो तो अनुभवांचा खजिना असतो हे मात्र नक्की.

यह धूप, यह मेघ, यह नदिया इतिहास नही - प्रार्थनाए है
इतिहासका उत्तर प्रतिइतिहास कभी नही होता, क्योंकी
दोनो भी एक दूसरेकी तलाश है
एक प्रश्न है तो दूसरा केवल प्रतिप्रश्न.
उत्तरही नहिं......

मी जेव्हा जेव्हा तुझ्या घरी येतो - तुझी अशीच काहीतरी स्थिती होते.....
का होते?

- मी.
- नरेन्द्र मेहता.
- आठवत नाही.
सलील

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार -

प्रकरण क्रमांक एक न्यायप्रविष्ट एडीपीआर
अ१२४क१३एम०५ह७२
दाखलअर्ज दिनांक अक्रा सहा एक्याणौ - एडीमर्फी
बातमी : आठवणीचा गळा दाबुन खून
वेळ : दुपारी तीन ते सव्वातीन सुमारे
हवा : ढगाळ पण पावसाची चिन्हं नाहीत
स्थळ : डेक्कन फ्लायओव्हर इंटरनॅशनल
लकडीपूल अल्काटॉकीज अथवा अबंध
रंग : नारिंगी हिरवा ब्राउन काळा सोनेरी हवा तो
मात्र गोरा
इतर : नदीला पाणी वेग कमी
वर्णन : करावं तितकं कमीच
शेरा : आत्महमीची जोखीम म्हणजे शाश्वती
निष्पत्ती : वाहून जाऊ शकत नाही जी
ती मुदतपूर्व उचकी लागल्याने
सर्व कामकाज तहकूब करावे लागत आहे

(अंक शेवटचा - प्रवेश शेवटचा)
आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार
आठवण जिवंत असल्याचे उघडकीस

5 comments:

  1. correction:

    1) Naresh Mehta
    2) Saleel (Wagh)

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  4. काहीच कळलं नाही!

    व्हान गॉघ किंवा पिकासोचं पेन्टींग जसं त्यांच्या मनातले विचार कळल्याशिवाय किंवा संदर्भाशिवाय समजत नाही तसं असेल कदाचित किंवा - I am just too dumb to understand! :-(

    पण तू आहेस कुठे इतके दिवस?? ना सलाम ना दुआ? मेल टाक!

    बाबा.

    ReplyDelete
  5. बरेच दिवस काही लिहिलं नाही...

    ReplyDelete